भ्रष्ट भारतीयांनी परदेशातील बँकांमध्ये ठेवलेला बेहिशोबी पैसा परत आणला पाहिजे या मुद्दाला देशातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. परंतु हे सगळे घडवून आणण्यासाठी काय केले पाहिजे याची मुद्देसूद मांडणी करुन ती प्रामाणिकपणे देशासमोर आणि सरकारसमोर ठेवण्याऐवजी रामदेवबाबांनी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी आणि महत्त्व वाढवण्यासाठी सगळ्या चाली रचल्या आणि त्या अंगलट आल्यावर पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.