OPINIONMAKER

Tuesday, June 3, 2008

हतबल मानसिकतेला(रिटायर करा) बदला

हिंदू धर्म कुणा भडभुंज्या महाराजामुळे टिकणार नाही किंवा कुणी विरोधात बोलले म्हणून संपणार नाही। या देशातील अनेक भागात कित्येक शतके इस्लामी राजवट होती, नंतर ब्रिटीशांची राजवट होती। त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हिंदूधर्म संपला नाही. कारण या धर्माची टिकून राहण्याची आंतरिक क्षमता प्रचंड आहे. गेल्या शतकात हिंदूंनी अनेक नव्या गोष्टी, प्रथा स्वीकारल्या, काळाच्या रेट्यानुसार जीवनशैलीत वेळोवेळी अनुरूप बदल स्वीकारला. त्यामुळे इथले समाजजीवन प्रवाही राहिले. त्याचे डबके बनले नाही.
------
परमेश्‍वराला रिटायर करावे, असे डॉ। श्रीराम लागू यांचे मत आहे। अधूनमधून ते त्यावर बोलत असतात। ते बोलले की लगेचच त्यांचे विचार मान्य नसणारे आक्रमकपणे आपली बाजू मांडू लागतात। त्यातून काही प्रमाणात वैचारिक घुसळण होते। डॉ। लागू यांचे म्हणणे क्षणभर बाजूला ठेवले तरी आपले देव, समाज, धर्म आणि भाविकता याबाबत मुळातून विचार करण्याची आपली तयारी आहे का? दुसरी गोष्ट म्हमजे देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली आणि लोकांवर मोहिनी टाकणाऱ्या बुवा, बापू, महाराज, शास्त्री यांचा भूतकाळ काय आहे, ते नेमके समाजासाठी काय करतात, सामाजिक सुधारणा, आरोग्य, शिक्षण याबाबत यांच्या भूमिका काय आहेत हे या निमित्ताने तपासण्याची गरज आहे।