OPINIONMAKER

Showing posts with label ठाकरे. Show all posts
Showing posts with label ठाकरे. Show all posts

Saturday, May 21, 2011

ढोंगीपणा आणि परिवर्तनाचा भाबडा आशावाद


 


                                                                                                                                 
ममता बॅनर्जी यांच्या इतकी धडाडी, जनतेच्या प्रश्नांवर मोठी आंदोलने उभी करुन आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहाण्याची ताकद, प्रलोभनांना बळी न पडता लढत राहण्याची तयारी महाराष्ट्रातील कोणत्या विरोधी नेत्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष विविध  महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर तडजोडी करुन त्याला तत्वाचा मुलामा देत असतात. कधीमधी पक्षासाठी नव्हे तर आपल्या वैयक्तिक संस्थांना मदत, अनुदान, परवानगी मिळावी म्हणून तर कधी आपल्या संस्थेची चौकशी होऊ नये, लांबणीवर पडावी म्हणून विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते सत्तेत असलेल्या नेत्यांशी सलगी करत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी जनतेसमोर असा पर्याय असेल तर शिवसेनाप्रमुखांचा आशावाद भाबडा ठरण्याची शक्यता जास्त आहे.

Monday, November 23, 2009

संघाचे "मनोगत'


विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धाडसाबाबत विधान करुन एकाच वेळी शिवसेना आणि भाजपला इशारा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांबाबत इतके धाडसी विधान यापूर्वी कोणत्याच नेत्याने केले नव्हते. शिवसैनिकांकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. 

Tuesday, June 16, 2009

मा. गो. वैद्यांचे काठावरचे चिंतन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे हिंदूचे बलशाली संघटन असते, मोठ्या प्रमाणावर मते फिरवण्याची ताकद असती तर भाजपच काय कॉंग्रेसवालेही रेशीमबागेत गुडघ्यावर चालत असते. भाजपला केंद्रात सत्ता मिळवून देण्याची ताकद संघाकडे असती तर भाजपचे झाडून सगळे नेते पहाटे उठून रोज प्रभात शाखेत उपस्थित राहिले असते. सध्या भाजप पराभूत मनस्थितीत आहे. पराभूत व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांची नेहमीच टर उडवली जाते. त्यांना उपदेशाचे, उपहासाचे डोस पाजले जातात. रा. स्व. संघाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य सध्या त्याच भूमिकेत आहेत. ते काहीही म्हणाले तरी, शेवटी सत्तेत येण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेण्याचे समीकरण कसे बांधायचे याचा विचार भाजपलाच करावा लागणार आहे


Tuesday, March 31, 2009

घराणेशाही



भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन- राव यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. समाजातील सर्वच क्षेत्रांत नकळत का होईना आपण घराणेशाही मान्य केली आहे. मग राजकारणाचा मुद्दा आला की घराणेशाहीबद्दल तावातावाने का बोलले जाते? अगदी साधे उदाहरण घेऊ. आपण आपली सगळी संपत्ती आपल्या वारसांना देतो. आयुष्यभर कष्टाने मिळवलेली संपत्ती आपल्या रक्ताच्या वारसाकडे जावी, असे वाटणे