OPINIONMAKER

Showing posts with label हौतात्म्य. Show all posts
Showing posts with label हौतात्म्य. Show all posts

Wednesday, January 26, 2011

हौतात्म्य


सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकातील जनतेच्या हिताचे रक्षण करताना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या लढ्यातील. आता त्या  पंक्तीत  सोनवणे यांनी  स्थान मिळवले आहे. आमच निर्ढावलेलेल राजकारणी अशा किती जणांना हौतात्म्य पत्करायला लावणार आहेत, माहिती  नाही.
-------------------------------------

  एकीकडे 'आदर्श' गैरव्यवहार करणारे नेते आणि आयएएस अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत. सुभाष लाला आणि रामानंद  तिवारी यांच्या सारखे निगरगट्ट अधिकारी तर बेडरपणे समाजाचा पैसा लुटून राजीनामा द्यायला नकार देण्याची हिंमत दाखवू शकतात आणि दुसरीकडे सोनवणेंसारख्या प्रामाणिक अधिकार्‍याला
आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे.

Tuesday, April 8, 2008

आमचे हीरो


ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आलेली होती. माझ्या भावंडाचे शिक्षण होऊ देत, मला जर नीट सेटल होऊ देत मग भ्रष्टाचाराविरुद्ध लढू, असे त्यांना कधी वाटले नाही. मनात आणले असते तर त्याच यंत्रणेचा भाग होऊन त्यांना त्यांचा वाटा मिळत राहिला असता. त्यांनी वाट्याचा विचारही केला नाही. भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी प्राणाची किंमत मोजली. असा आवाज उठवणाऱ्यांना...
विशेष संरक्षण देण्यासाठी कायदा तातडीने कायदा करण्याची गरज आहे.