OPINIONMAKER

Monday, March 9, 2009

कुणाची माघार, कुणाची सरशी? ( शिरुर लोकसभा मतदारसंघ)



कुणाची माघार तर कुणाचा विजय निश्‍चित अशी स्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातील उमेदवारीमुळे झाली आहे. श्री. पवार यांच्या डावपेचांचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना. या मतदारसंघात आढळराव यांना अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिरुर विधानसभा मतदारसंघात बाबुराव पाचर्णे आमदार आहेत. पाचर्णे मूळचे कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेले पण तिथे आमदरकी मिळण्यात निर्माण झालेले अडथळे पाहून ते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले आणि आमदरकी मिळवली. पवार इथून लोकसभेची निवडणूक लढणार म्हटल्यावर पाचर्णे मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. हडपसरमध्ये कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर एक त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघाची गणना राष्ट्रवाद कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून होऊ शकते. अशा स्थितीत जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहजपणे मिळायला हवी होती. पण राजकारण कधीच इतके सरळ नसते.

आढळरावांचा चमत्कार