OPINIONMAKER

Monday, January 7, 2008

कॉंग्रेसला बदलावेच लागेल




मतदार आता केवळ विकासकामांवर समाधानी दिसत नाही. पक्षाची भूमिका, जाहीरनामा याबरोबरच आपली अस्मिता जोपासणारा, स्वाभिमानाला खतपाणी घालणारा एक "चेहरा' त्याला हवा असतो. स्वतःला ज्याच्याशी जोडता येईल, अशा नेत्याच्या शोधात तो असतो. म्हणूनच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अगोदर जाहीर करणे आवश्‍यक बनले आहे. त्यासाठी कॉंग्रेसला त्यांच्या "दरबारी' कार्यपद्धतीत बदल करावा लागेल.