OPINIONMAKER

Tuesday, June 16, 2009

मा. गो. वैद्यांचे काठावरचे चिंतन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे हिंदूचे बलशाली संघटन असते, मोठ्या प्रमाणावर मते फिरवण्याची ताकद असती तर भाजपच काय कॉंग्रेसवालेही रेशीमबागेत गुडघ्यावर चालत असते. भाजपला केंद्रात सत्ता मिळवून देण्याची ताकद संघाकडे असती तर भाजपचे झाडून सगळे नेते पहाटे उठून रोज प्रभात शाखेत उपस्थित राहिले असते. सध्या भाजप पराभूत मनस्थितीत आहे. पराभूत व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांची नेहमीच टर उडवली जाते. त्यांना उपदेशाचे, उपहासाचे डोस पाजले जातात. रा. स्व. संघाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य सध्या त्याच भूमिकेत आहेत. ते काहीही म्हणाले तरी, शेवटी सत्तेत येण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेण्याचे समीकरण कसे बांधायचे याचा विचार भाजपलाच करावा लागणार आहे