OPINIONMAKER

Wednesday, January 23, 2008

संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर, नामदेव, शिवाजी, फुले, कर्वे कुणा कुणाचे?

आपली कुवत, बुद्धीमत्ता, कष्ट करण्याची वृत्ती, धीर धरण्याची वृत्ती याबाबतची आपली पूर्ण क्षमता आणि मर्यादा लक्षात न घेताच कोणतीही व्यक्ती आपली प्रगती होत नसल्याचे खापर अन्य जाती, व्यवस्था, समाज यांच्यावर फोडण्याच्या निष्कर्षाप्रत येते. अशा मानसिक अवस्थेत असलेले युवक, महिला, शेतकरी, कामगार म्हणजे जातीधर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांसाठी "रॉ मटेरियल'च ठरते.