OPINIONMAKER

Saturday, September 27, 2008

राजाचे संग्रहालय


सातारा जिल्ह्यातील तत्कालीन औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांचे चित्रकलेवर नितांत प्रेम। स्वतः चित्रकार असलेल्या या राजाने अनेक कलाकृती निर्माण केल्या. चित्रकारांना प्रोत्साहन, मानसन्मान दिला. अनेकांना पदरी ठेवून घेतले आणि त्यांच्याकडून अप्रतिम कलाकृती निर्माण करून घेतल्या. त्याचबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्तमोत्तम चित्रे, शिल्पे आणि कलाकृती औंधला आणल्या आणि त्यातून एक उत्तम संग्रहालय निर्माण केले.


साताऱ्याला शिकायला असताना त्या राजकुमाराला त्याचे वडील अधूनमधून भेटायला येत। असेच एकदा वडील येणार असल्याचे कळल्यावर त्या राजकुमाराने, येताना चित्रकलेचे साहित्य घेऊन येण्याची गळ घालणारे पत्र वडिलांना लिहिले होते. त्या वेळी त्याचे वय होते अवघे बारा-तेरा वर्षांचे. पुढे गादीवर आल्यानंतर चित्रकलेवर नितांत प्रेम असणाऱ्या या राजाने स्वतः अनेक चित्रे काढली. नवेनवे प्रयोग केले. त्याचबरोबर रयतेतील गुणी कलाकारांना शोधून त्यांना आपल्या दरबारात आणून त्यांच्याकडून अद्वितीय अशी चित्रे काढून घेतली. त्यांचा सन्मान केला. अनेक शिल्पे, दुर्मिळ वस्तू जमवल्या आणि त्यातून उभे राहिले औंधचे देखणे संग्रहालय.श्रीमंत राजेसाहेब भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी असे त्यांचे नाव. 

मराठ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज

आपले शोषण कोणाकडून होते आहे, खरेच आपली प्रगती झालेली आहे का, आपण बदलायला तयार आहोत का, याचा विचार मराठा समाजाने करण्याची गरज आहे. मराठा जातीच्या नावावर राजकारण करणार्‍या नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर उठसूठ कुणीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपण भारावून जाण्याची किंवा चवताळून उठण्याची गरज नाही. कारण शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. त्यामुळेच सगळ्या समाजाचे नेतृत्त्व करण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन त्यांना प्रगतीच्या संधी दिल्या पाहिजेत. आरक्षण मागण्याऐवजी दूध व उस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करुन स्वतःचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना घरी बसवले पाहिजे.