OPINIONMAKER

Monday, November 23, 2009

संघाचे "मनोगत'


विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धाडसाबाबत विधान करुन एकाच वेळी शिवसेना आणि भाजपला इशारा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांबाबत इतके धाडसी विधान यापूर्वी कोणत्याच नेत्याने केले नव्हते. शिवसैनिकांकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. 

Tuesday, June 16, 2009

मा. गो. वैद्यांचे काठावरचे चिंतन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे हिंदूचे बलशाली संघटन असते, मोठ्या प्रमाणावर मते फिरवण्याची ताकद असती तर भाजपच काय कॉंग्रेसवालेही रेशीमबागेत गुडघ्यावर चालत असते. भाजपला केंद्रात सत्ता मिळवून देण्याची ताकद संघाकडे असती तर भाजपचे झाडून सगळे नेते पहाटे उठून रोज प्रभात शाखेत उपस्थित राहिले असते. सध्या भाजप पराभूत मनस्थितीत आहे. पराभूत व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांची नेहमीच टर उडवली जाते. त्यांना उपदेशाचे, उपहासाचे डोस पाजले जातात. रा. स्व. संघाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य सध्या त्याच भूमिकेत आहेत. ते काहीही म्हणाले तरी, शेवटी सत्तेत येण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेण्याचे समीकरण कसे बांधायचे याचा विचार भाजपलाच करावा लागणार आहे


Tuesday, March 31, 2009

घराणेशाही



भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन- राव यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. समाजातील सर्वच क्षेत्रांत नकळत का होईना आपण घराणेशाही मान्य केली आहे. मग राजकारणाचा मुद्दा आला की घराणेशाहीबद्दल तावातावाने का बोलले जाते? अगदी साधे उदाहरण घेऊ. आपण आपली सगळी संपत्ती आपल्या वारसांना देतो. आयुष्यभर कष्टाने मिळवलेली संपत्ती आपल्या रक्ताच्या वारसाकडे जावी, असे वाटणे

Tuesday, March 17, 2009

ताकद राष्ट्रवादीची आणि सुभेदारांची


पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे सहा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबरदस्त ताकद असल्याचे सांगितले जाते. या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था, साखर कारखाने हे सगळे लक्षात घेतले तर पक्षाचे या भागात निर्विवाद वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. या पाच जिल्ह्यातील बारापैकी कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, कऱ्हाड, बारामती, नगर (दक्षिण) येथून मागील वेळी पक्षाचे खासदार निवडून आले होते. त्याखेरीज पंढरपूर (राखीव) मतदारसंघातून पक्षाच्या पाठिंब्यावर रामदास आठवले निवडून आले होते. उर्वरीत चार जागांपैकी दोन कॉंग्रेसला (सांगली व पुणे) आणि प्रत्येकी एक भारतीय जनता पक्षा (सोलापूर) व शिवसेनेला (खेड, जि. पुणे) मिळाली होती.

पंजा, घड्याळ कशाला? कोंबडाही चालेल...

Monday, March 9, 2009

कुणाची माघार, कुणाची सरशी? ( शिरुर लोकसभा मतदारसंघ)



कुणाची माघार तर कुणाचा विजय निश्‍चित अशी स्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातील उमेदवारीमुळे झाली आहे. श्री. पवार यांच्या डावपेचांचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना. या मतदारसंघात आढळराव यांना अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिरुर विधानसभा मतदारसंघात बाबुराव पाचर्णे आमदार आहेत. पाचर्णे मूळचे कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेले पण तिथे आमदरकी मिळण्यात निर्माण झालेले अडथळे पाहून ते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले आणि आमदरकी मिळवली. पवार इथून लोकसभेची निवडणूक लढणार म्हटल्यावर पाचर्णे मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. हडपसरमध्ये कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर एक त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघाची गणना राष्ट्रवाद कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून होऊ शकते. अशा स्थितीत जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहजपणे मिळायला हवी होती. पण राजकारण कधीच इतके सरळ नसते.

आढळरावांचा चमत्कार