OPINIONMAKER

Monday, March 9, 2009

कुणाची माघार, कुणाची सरशी? ( शिरुर लोकसभा मतदारसंघ)



कुणाची माघार तर कुणाचा विजय निश्‍चित अशी स्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातील उमेदवारीमुळे झाली आहे. श्री. पवार यांच्या डावपेचांचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना. या मतदारसंघात आढळराव यांना अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिरुर विधानसभा मतदारसंघात बाबुराव पाचर्णे आमदार आहेत. पाचर्णे मूळचे कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेले पण तिथे आमदरकी मिळण्यात निर्माण झालेले अडथळे पाहून ते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले आणि आमदरकी मिळवली. पवार इथून लोकसभेची निवडणूक लढणार म्हटल्यावर पाचर्णे मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. हडपसरमध्ये कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर एक त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघाची गणना राष्ट्रवाद कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून होऊ शकते. अशा स्थितीत जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहजपणे मिळायला हवी होती. पण राजकारण कधीच इतके सरळ नसते.

आढळरावांचा चमत्कार

Monday, February 16, 2009

पब, महिला आणि संस्कृती


सुधीर मुतालिक, नाशिक (अतिथी लेखक)
sudhirmutalik@gmail.com
---------------------------------
स्वातंत्र्य ही सुसंस्कृत समाजाची गरज आहे. स्वातंत्र्य ही विकासाची पहिली अट आहे. स्वातंत्र्य आहे; पण ते विशिष्ट गटापुरते, विशिष्ट लिंगापुरते मर्यादित आहे. ही सुसंस्कृत समाजाची लक्षणे नव्हेत किंबहुना मर्यादितांना स्वातंत्र्य देणारा समाज अघोरीच म्हटला पाहिजे. अशा अघोरी, अमानवी समाजाला हआपण तालिबानी संबोधतो. पबमध्ये पुरुषांनी गेलेले चालते; पण स्त्रियांनी जाण्याने संस्कृती भ्रष्ट होते, हा कसला माज आहे? पुरुषांना पबमध्ये बसून गप्पा मारण्याची, मद्य चाखण्याची इच्छा होऊ शकते तर कोणत्या Biological कारणामुळे स्त्रियांना तसा मोह होऊ शकत नाही? ज्या मुलींना वयाच्या 18 वर्षानंतर सज्ञान म्हणवून घेण्याचा आणि मतदानाचा घटनेने अधिकार दिला आहे, त्यांना अनधिकृत नसणाऱ्या ठिकाणी जायला मकरणारे हे बाजीराव कोण आणि ते स्वतकाय समजतात?

Friday, January 30, 2009

असाही एक ब्राह्मण...


सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या राजकारणात एखादा ब्राह्मण किती आत्मविश्‍वासाने वावरु शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी. पुण्यातील कॉंग्रेसमध्ये प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष पक्षांतर्गत संघर्ष केला. सर्वच कॉंग्रेसजनांमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा जो महत्त्वपूर्ण गुण असतो तो त्यांच्यातही मुरलेला आहे. त्यामुळे हार-जीत त्यांच्याही वाट्याला आली तरीही ते पुन्हा उसळून उभे राहिले. अगदी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर पुणे विकास आघाडी स्थापन करुन त्यांनी महापालिकेतील सत्ता ताब्यात ठेवली. लोकसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वळचणीला गेले. पराभव पत्करला. पण कधीच कायमची हार मानली नाही. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची ही त्यांची कार्यपद्धती आहे. पुण्यात 1994 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असोत किंवा नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धा. डोळे दिपवून टाकणारे भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणणे ही त्यांची खासियत.

Wednesday, January 14, 2009

लेखणीचे सामर्थ्य!


एखाद्या गुंडाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर पत्रकारांनी त्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातम्या व लेख यामुळे तीनच दिवसात त्याने पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगावे लागले. जोखिम स्वीकारुन पत्रकारांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले। त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे। यापुढील काळात अशा घटनांबाबत समाजानेही याबाबत रस्त्यावर येऊन प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. तरच अशा प्रवत्तींना रोखता येईल.


Monday, January 12, 2009

वाल्याचे वाल्मिकी होणार, महाराष्ट्रात रामराज्य येणार...


दादांबद्दल उभ्या महाराष्ट्रात एक आदरयुक्त दबदबा आहे. अत्यंत सडतोड बोलणे, वेगाने कामे मार्गी लावणे आणि प्रशासनावर करडी नजर यामुळे सर्वसामान्य लोकांना दादांचे व्यक्तिमत्त्व आकर्षित करते. चुकीचे काम करणाऱ्याला दादा अजिबात थारा देत नाहीत, अशा व्यक्तींना लगेचच त्यांची जागा दाखवून देतात. सध्याच्या काळात असे नेते दुर्मिळ असल्यानेच दादांबद्दल लोकांना आदर वाटतो. होय, आपले जलसंपदा मंत्री आणि समस्त पुणे शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दलच आम्ही लिहितो आहोत. (खरे तर महाराष्ट्राला "साहेब' म्हटले की यशवंतराव चव्हाणसाहेब आणि "दादा' म्हटले की फक्त वसंतदादा पाटील यांचीच नावे आठवतात. पण काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते स्वतःला "साहेब' आणि "दादा' संबोधू लागल्यामुळे हा खुलासा करणे भाग पडले.)