OPINIONMAKER

Monday, March 28, 2011

ज्योतिषांचा सायकॉलॉजिकल गेम...



ज्योतिषी नेहमी सायकॉलॉजिकल गेम खेळत असतात. समोरच्याला या गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो बेसवाध असतो. त्यामुळेच या गेममध्ये विजय नेहमी ज्योतिषांचा होतो. मात्र, पुण्यातील  एक ज्योतिषी मोठी शेखी मारायला गेले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकित केले. आता पुण्यातील ज्योतिषाने सांगितल्यावर भारताचा पराभव अटळ होता. परंतु युवराजसिंग आणि रैना यांना हे मान्य नव्हते. हे कसे काय घडले....

Sunday, March 27, 2011

संधी नावाचा साधू


 
 
 
 
 
सौजन्य ः http://archives.digitaltoday.in
 ------------------------------------------
संधी नावाचा साधू
हिंदुत्वाचा चेहरा असे किती साजिरा
नितीन म्हणतो बघ आहे किती गोल गोजिरा

पण लाल म्हणतो 'जिना' मजला प्रिय भारी
मग जसवंत ओढतसे सूर तोच भरजारी

उमा म्हणते उदार हा अटल दिसतो जरा
तोच आमुचा मुखवटा आहे खरा

मज वाटे किती ही गम्मत न्यारी
हिंदुत्व हे आपुले लई लई भारी

मग लाविला मुखवटा यांनी रामाचा मंदिरी
फसली भारतीय जनता भोळी बिचारी

पण आमुचा अरुण तो फार विचारी
सांगतसे गुप्तपणे गम्मत खरीखुरी

म्हणतो कसा आमुचे हिंदुत्व संधीसाधू
पण आता या रॉबर्ट ब्लेकला कैसे शोधू

हिंदुत्व ही तर आमुची जीवनशैली
विकिलिक्सने तिला ठरवली बदफैली

या लिक्सवर घाला लवकर बंदी
साधलेली आहे आपण आपली संधी
-सुहास यादव
------------------------------- 

Tuesday, March 8, 2011

त्या "यो" !

सुधीर मुतालिक  (अतिथी लेखक) 

      काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला  होणारा फायदा याचा  विचार करून, ती यादी मला आधी कळवुन  वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होते. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर ट्रेनिंग रूम मध्ये पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती , दिपवून  टाकणारी!  माफक आणि निमंत्रितच लोकांना बसायला जागा. भराभर मी bag टेबल वर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम " यो " दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धIडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला -

Sunday, February 20, 2011

श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय?

- मयुरेश कुलकर्णी  (अतिथी लेखक)

तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मी या एका प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडणार आहे. शेवटी या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्यावरचा निर्णय हे तुमच्याच हातात आहे.
आपण 'श्रीमंत मरायची' बाजू आधी बघुयात. 'श्रीमंत मरायचं' या विचाराची सुरुवात माझ्या डोक्यात एका घटनेमुळे झाली.....

Sunday, February 13, 2011

पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी

नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरचित्रवाणी वृ्त्त वाहिन्यांच्या पत्रकारितेबाबत काही विधाने केल्यानंतर  पत्रकारांनी त्यांच्यावर  बहिष्काराचे अस्त्र उपसले. अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार या अस्त्राकडे ढुंकनही पाहिले नाही. आपण काहीच चुकीचे बोललेलो नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ते त्यावर ठाम राहिले.  त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी * अटी लागू अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकर पुढार्‍यांनी तातडीने अजित पवार यांच्यावरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करुन टाकले आणि या प्रकरणातून एक प्रकारे स्वतःची सुटका करुन घेतली.  मूळ मुद्दा आहे तो हे सगळे कशामुळे घडले. सध्याची पत्रकारिता आणि पत्रकारांना नोकरी म्हणून  काय गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि अजित पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते?