OPINIONMAKER

Tuesday, March 8, 2011

त्या "यो" !

सुधीर मुतालिक  (अतिथी लेखक) 

      काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला  होणारा फायदा याचा  विचार करून, ती यादी मला आधी कळवुन  वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होते. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर ट्रेनिंग रूम मध्ये पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती , दिपवून  टाकणारी!  माफक आणि निमंत्रितच लोकांना बसायला जागा. भराभर मी bag टेबल वर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम " यो " दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धIडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला -

Sunday, February 20, 2011

श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय?

- मयुरेश कुलकर्णी  (अतिथी लेखक)

तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मी या एका प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडणार आहे. शेवटी या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्यावरचा निर्णय हे तुमच्याच हातात आहे.
आपण 'श्रीमंत मरायची' बाजू आधी बघुयात. 'श्रीमंत मरायचं' या विचाराची सुरुवात माझ्या डोक्यात एका घटनेमुळे झाली.....

Sunday, February 13, 2011

पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी

नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरचित्रवाणी वृ्त्त वाहिन्यांच्या पत्रकारितेबाबत काही विधाने केल्यानंतर  पत्रकारांनी त्यांच्यावर  बहिष्काराचे अस्त्र उपसले. अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार या अस्त्राकडे ढुंकनही पाहिले नाही. आपण काहीच चुकीचे बोललेलो नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ते त्यावर ठाम राहिले.  त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी * अटी लागू अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकर पुढार्‍यांनी तातडीने अजित पवार यांच्यावरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करुन टाकले आणि या प्रकरणातून एक प्रकारे स्वतःची सुटका करुन घेतली.  मूळ मुद्दा आहे तो हे सगळे कशामुळे घडले. सध्याची पत्रकारिता आणि पत्रकारांना नोकरी म्हणून  काय गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि अजित पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते?

Wednesday, January 26, 2011

हौतात्म्य


सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकातील जनतेच्या हिताचे रक्षण करताना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या लढ्यातील. आता त्या  पंक्तीत  सोनवणे यांनी  स्थान मिळवले आहे. आमच निर्ढावलेलेल राजकारणी अशा किती जणांना हौतात्म्य पत्करायला लावणार आहेत, माहिती  नाही.
-------------------------------------

  एकीकडे 'आदर्श' गैरव्यवहार करणारे नेते आणि आयएएस अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत. सुभाष लाला आणि रामानंद  तिवारी यांच्या सारखे निगरगट्ट अधिकारी तर बेडरपणे समाजाचा पैसा लुटून राजीनामा द्यायला नकार देण्याची हिंमत दाखवू शकतात आणि दुसरीकडे सोनवणेंसारख्या प्रामाणिक अधिकार्‍याला
आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे.

माणूस श्रेष्ठ


आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्‍न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्‍वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्‍न आहे.
----
गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्‍न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?