OPINIONMAKER

Saturday, September 27, 2008

राजाचे संग्रहालय


सातारा जिल्ह्यातील तत्कालीन औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांचे चित्रकलेवर नितांत प्रेम। स्वतः चित्रकार असलेल्या या राजाने अनेक कलाकृती निर्माण केल्या. चित्रकारांना प्रोत्साहन, मानसन्मान दिला. अनेकांना पदरी ठेवून घेतले आणि त्यांच्याकडून अप्रतिम कलाकृती निर्माण करून घेतल्या. त्याचबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्तमोत्तम चित्रे, शिल्पे आणि कलाकृती औंधला आणल्या आणि त्यातून एक उत्तम संग्रहालय निर्माण केले.


साताऱ्याला शिकायला असताना त्या राजकुमाराला त्याचे वडील अधूनमधून भेटायला येत। असेच एकदा वडील येणार असल्याचे कळल्यावर त्या राजकुमाराने, येताना चित्रकलेचे साहित्य घेऊन येण्याची गळ घालणारे पत्र वडिलांना लिहिले होते. त्या वेळी त्याचे वय होते अवघे बारा-तेरा वर्षांचे. पुढे गादीवर आल्यानंतर चित्रकलेवर नितांत प्रेम असणाऱ्या या राजाने स्वतः अनेक चित्रे काढली. नवेनवे प्रयोग केले. त्याचबरोबर रयतेतील गुणी कलाकारांना शोधून त्यांना आपल्या दरबारात आणून त्यांच्याकडून अद्वितीय अशी चित्रे काढून घेतली. त्यांचा सन्मान केला. अनेक शिल्पे, दुर्मिळ वस्तू जमवल्या आणि त्यातून उभे राहिले औंधचे देखणे संग्रहालय.श्रीमंत राजेसाहेब भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी असे त्यांचे नाव. 

मराठ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज

आपले शोषण कोणाकडून होते आहे, खरेच आपली प्रगती झालेली आहे का, आपण बदलायला तयार आहोत का, याचा विचार मराठा समाजाने करण्याची गरज आहे. मराठा जातीच्या नावावर राजकारण करणार्‍या नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर उठसूठ कुणीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपण भारावून जाण्याची किंवा चवताळून उठण्याची गरज नाही. कारण शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. त्यामुळेच सगळ्या समाजाचे नेतृत्त्व करण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन त्यांना प्रगतीच्या संधी दिल्या पाहिजेत. आरक्षण मागण्याऐवजी दूध व उस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करुन स्वतःचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना घरी बसवले पाहिजे.

Monday, September 1, 2008

साहित्यिकांनो शासनाच्या दारात उभे राहू नका!


साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ठिकाण, संयोजन, खर्च यावर वाद घालत बसण्यापेक्षा साहित्यिकांनी स्वतःला इथल्या समाजाशी, त्यांच्या प्रश्‍नांशी जोडून घेणे महत्त्वाचे आहे. तरच लोकांना साहित्यिकांबद्दल आत्मीयता वाटेल. संमेलनासाठी शासन आणि नेतेमंडळींकडून घाऊक स्वरुपात निधी मिळवणे सोपे आहे. त्याउलट लोकांनी संमेलनांसाठी उत्स्फूर्तपणे निधी द्यावा, यासाठी त्यांच्यात विश्‍वास निर्माण करणे आवश्‍यक आहे। आपण शासनदरबारी की लोकांच्या दरबारात उभे राहायचे याचा निर्णय साहित्यिकांना घ्यावा लागेल.
------

दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जोरदार रस्सीखेच आणि वाद होतात। साहित्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य वाचकांना यात फारसा रस नसतो। अध्यक्ष कोण झाला यावरून वाचकाच्या अभिरूचीमध्ये काहीही फरक पडत नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही साहित्य संमेलन असले तरी मराठी माणूस तुडुंब गर्दी करतो। 

पालकांची मानसिकता अशी का?

आसाराम बापू यांच्या संस्थेमार्फत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहात दोन कोवळ्या जीवांचा खून झाला। त्यातील एकजण तर पुण्यातील अवघा साडेपाच वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात मुलांना वसतिगृहात पाठवण्यामागे पालकांची काय मानसिकता असावी? चांगले संस्कार करणे, शिस्त लावणे ही जबाबदारी आई-वडिलांचीच आहे. ती शिक्षकांवर किंवा कुठल्या तरी गुरुकुलावर सोपविणे म्हणजे पळपुटेपणाच आहे.

आरक्षण नको कर्मवीर हवेत!"


फुकाचं वेड पांघरू नका', या लेखात (महाराष्ट्र टाईम्स, दि। 26 ऑगस्ट 2006) केवळ आरक्षण मागतो म्हणून अख्ख्या मराठा समाजावर जोरदार टीका करण्यात आली आहे। मुळात मराठा समाजाचे प्रश्‍न काय आहेत आणि या समाजाची प्रगती न होण्यास तो स्वतः कितपत कारणीभूत आहे याचा लेखाजोखा न मांडता शिवाजी, शाहू, यशवंतराव आमचे कोणी लागत नाहीत, असे जाहीर करण्याचा सल्ला दिला आहे। महाराष्ट्रात मराठ्यांचे संख्याबळ जास्त असल्याची